दया तिचे नाव ,भुतांचे पालन |
आनिक निर्दालन , कंटकांचे ||
काल मि संत तुकारामांचा हा अभंग माझ्या मुलाला शिकवायचे ठरवले, त्याला शिकविला , त्याने पाठ ही केला .त्याचा प्रतीप्रश्न येण्याअगोदर मि यातील शब्दांच्या अर्थासाठी संशोधन करू लागलो . संत तुकाराम "भुते पाळा" म्हणजे "दया" असे कसे म्हणू शकतात ,त्यामुळे मि भुत या शब्दाचा त्या काळातील अर्थ शोधू लागलो ,परंतू सगळी कडे पिशाच्च, हाडळ ,आणि आत्मा असेच अर्थ मिळत होते ,परंतू एके ठिकाणी गिरिश घलसासी यांच्या रामदास आणि शिवराय या प्रवचनात ते असे सांगत होते कि ,भुत म्हणजे मागे राहीलेले शोषीत मग मि शोषीत या शब्दाचा अर्थ शोधू लागलो तर तो असा मिळाला ,पिढ्यान पिढ्या ज्यांचे शोषण होत आहेत ते पिडीत, तळागाळातील जातीच्या उतरंडीतील खालाच्या जातीतले म्हणजे "शोषीत" असा अर्थ मिळाला . म्हणजेच तळागाळातील शोषीत आणि पिडीत यांचे पालनकर्ते बना ,त्यांचा सांभाळ करा . पुढे संत तुकाराम म्हणतात आनिक निर्दालन कंटकांचे ,"कंटक" म्हणजे "त्रास देणारे" ,आता या शोषीत आणि पीडीत ज्याना हे कंटक त्रास देत असत ते कोण असू शकतील, आता या जातीच्या उतरंडीतील तळातल्या भुताना फक्त उच्च वर्णीयच त्रास देत असत , नाहीतर संत तुकारामानी इथे भुतांचे पालन असे शब्द वापरले नसते . जर संत तुकारामाना कंटक हा शब्द येथील सर्व स्थानीकाना त्रास देणाऱ्या मुघलांबद्दल बोलायचा असता तर त्यानी "दया तिचे नाव , मरहट्ट्यांचे पालन" असे म्हटले असते , कारण त्याकाळी महाराष्ट्रातील स्थानिकांना "मरहट्टा" हा सर्वसमावेशक शब्द होता . आता या अभंगातून असे दिसून येते कि, या संत तुकारामाना ही जातीच्या उतरंडीची आणि त्याच्यामुळे होणाऱ्या शोषणाचा अनूभव आलेला असावा .
या जातीच्या शोषणातून वामणाने बळी राजाची हत्या केली असावी ,याची जाणीव संत तुकाराम याना असावी . त्यामुळेच संत तुकाराम स्वत:ला "बळी राजाच्या" कार्याचा आणि विचारांचा वंशज समजत .
संत तुकाराम पुढे म्हणत .
तुका म्हणे आम्ही बळी |
जीव दिला पायातळी ||
- प्रमोद शिंदे
(९९६७०१३३३६)
No comments:
Post a Comment