Wednesday, October 5, 2022

जल जंगल जमीन आणि आदिवासी

*जल, जंगल, जमीन आणि आदिवासी*
विचार करा एखादा परका व्यक्ती तुमच्या घरात पाहुणा म्हणून येतो, तुम्ही त्याचा पाहुणचार करता, काही कालावधी नंतर तो व्यावसायिक दृष्टीने घरात बदल करायला लागतो, घराचं मूळ स्वरूपच विद्रुप करतो, त्यामुळे तुमच्या जगण्याचे प्रश्न उभे राहतात, तदनंतरही तुम्ही शांत बसाल का? बंड करालंच ना?
अगदी आतापर्यंत निर्माण झालेल्या भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ सगळ्या भाषेतील चित्रपट पाहिल्यास आपण पाहिले आहे की आपल्या पूर्वजांच्या जल, जमीन, संपत्तीचे रक्षण करणारा आपल्यासाठी हिरो असतो आणि पुढे हेच चित्रपट सर्वात जास्त पैसा कमावणारे ठरतात.
हे जर सर्वमान्य सत्य असेल तर हजारो वर्षांपासून जंगलात राहणारा पिढ्यानं पिढ्या ज्यांनी जल, जंगल, जमीन यास देवता मानून पूजली व जोपासली, त्या वसुंधरेला वाचविण्यासाठी हा आदिवासी बंड करतो तर तो व्हिलेन कसा ठरू शकतो?
मला माहिताय मी हे लिहताना मोठी रिस्क घेतोय, कारण ज्यांनी ज्यांनी त्या बाजूने लिहण्याचा बोलण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना या भांडवलदारांच्या हातातील सरकारने शहरी नक्षली म्हणून तुरुंगात डांबलंय. तरीही मी लिहणार, कारण यावर बोलणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
आता पर्यंत जरी माझ्या भेटीस कोणी असा नक्षलवादी आला नाही तरी लिखाणासाठी भारतातील काही राज्यातील जंगलात फिरत असताना, स्थानिक आदिवासीसोबत चर्चा करताना हे नक्षलवादी कोण्या रॉबिनहूड पेक्षा कमी नाहीत हेच जाणविले. सगळ्यांच्या मनात यांच्याबद्दल एक आदराची भावना या लोकांमध्ये दिसून आली. 
त्यांना नक्षलवादी म्हणून घडण्यासाठी तसें अनेक जुने मुद्दे आहेत, पण सध्या दोन मुद्दे मला इथे मांडायला हवेत असे मला वाटतेय कारण हा विकलेला मीडिया हे दाखवणार नाही.
1. मध्य प्रदेशातील कुनो नेशनल पार्कमध्ये मोदीजी नी 8 चिते आणून वसवले, त्यानंतर आपल्याला एवढंच दिसलं किंबहुना एवढंच दाखवलं गेलं. पण त्यासाठी या जंगलातील 22 गावातील हजारो कुटुंबाना विस्थापित व्हावं लागलं, याबद्दल कुठेच बातमी नाही. या आदिवासीना आपलं पिढ्यानं पिढ्याचं जल, जंगल, जमीन सोडून जावं लागलं. 
हीच गत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात 25 खाणीसाठी खोदकाम आणि जंगल तोड सुरू केले केलेली आहे, त्यासाठी सुध्दा स्थानिक आदिवासी कुटुंबाना सैन्य बळाचा वापर करीत विस्थापित करण्याचे कार्य सुरू झालंय.
हेच गेली अनेक वर्ष सुरू आहे, काँगेस असो की भाजपा यांनी आलिपाळीने सुरू ठेवलंय. 
यावर माझे अनेक मित्र म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हाती शस्त्र घेणं चुकीचं आहे. शस्त्र न घेता लढा म्हणावं, हाच प्रश्न मी तेथील स्थानिकांना विचारला यावर तेथील स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की पाकिस्थान व चिन हे बाहेरचे आहेत त्यांच्या विरुद्ध लढताना शस्त्र वापरता हे ठीक आहे पण मग घरच्या लढाईत पोलीस बळ व सैन्य बळ तसेच शस्त्रात्रे वापरले जातात का?
हा लढा आमच्या जल जंगल जमीन हीं साधन संपत्ती वाचविण्यासाठी आहे, आम्ही निसर्गाला पूजतो, आमचे देव आहेत हे, आमच्या हातून हेच गेले तर आम्हाला सुध्दा तुमच्या शहरात पोटासाठी भीक मागावी लागेल. यासाठी आम्ही लढतोय तर यावर आमच्यावर गोळ्या झाडणारे आम्हाला शस्त्र का घेता असे म्हणतात.
आमची 750 कुळं जगभर आहेत, आम्ही इथले मूळनिवासी आहोत.
आमचा मूळ लिंगो जंगो आम्ही त्यास पूजतो, त्याचा फोटो मी सोबत देत आहे (योनी, अर्ध शिष्न, आणि बाहेर पडणारे शुक्राणू असावेत.)  हे प्रकृती निर्मितीचे साधन तोच आमचा देव आहे."
मी नीट पाहिले तर ते थोडे बहुत त्रिशूल सारखे दिसते, त्यावरूनच त्रिशूलाची निर्मिती झाली असावी, असे वाटावे, कारण हे आदिवासी महादेवाला बुढाबाबा तर पार्वती ला महामाया म्हणतात.
आता शेवटी प्रश्न राहतो हे नक्षलवादी, दहशतवादी आणि क्रूर आहेत का?
हाच प्रश्न त्यांच्या घरात राहून स्वतःची प्रगती करत पुरस्कार घेतलेल्या प्रकाश आमटे यांना विचारा!
त्यांना कधी तरी विचारा, की हे आदिवासी का करतायेत हे ? तुम्हाला काही त्रास दितायेत का?

- प्रमोद शिंदे
9967013336
(जास्तीस जास्त फॉरवर्ड करा.)

Tuesday, October 4, 2022

भाजपचे विकृत राजकारण

शिंदे गटातील आमदार खासदारानो,
नुकतीच ओवळा-माजिवाडा मतदारसंघाच्या जागेवरून एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात वाद झाल्याची बातमी कानावर आली, मुळात प्रताप सरनाईक यांचा हा मतदारसंघ पण त्यांनी भाजपा साठी सोडवा असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरला. यावर प्रताप सरनाईक यांनी विरोध केला असता, त्यांच्यावर थांबवलेली ED ची कारवाई पून्हा सुरू केली गेली. (भाजपाचा मेन स्त्रीम मीडिया ही बातमी दाखवणार नाही.)
यातून दोन मुद्दे प्रकर्षाने समोर आलेत ते म्हणजे एकतर हे सरकार  अनधिकृत आहे आणि हे कोसळणार हे भाजपच्या सर्वांना माहिती आहे म्हणून भाजपने आपली मोर्चे बांधणी सुरू केलीय. दुसरं म्हणजे शिंदे गटातील आमदारांनी खाली माना घालून मुकाट्यानं गप्प बसावं नाहीतर गाठ भाजपाशी आहे, हीं धमकीच भाजपने दिलीय.
आता शिंदे गटातील आमदार आणि खासदारानो तुम्हाला खालील तीन सत्य गोष्टी सांगतो, त्या मान्य आहेत का कळवा.
1. तुम्ही तुमचा मतदार संघ भाजपच्या भाजपासाठी सोडण्यास तयार आहात का? ( प्रताप सरनाईक प्रकरण )
2. भाजपाने तुम्हाला मतदारसंघ दिला तर तुम्ही भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्यास तयार आहात का? (उदा. 2019 ची निवडणूक... महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष )
3. जरी धोक्याने तुम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आणि शिवसेना शिंदे गट निवडणूकित आला तरी पक्ष आणि चिन्ह तुमचं पण उमेदवार भाजपचा हे मान्य कराल का? (उदा. 2019ची निवडणूक... नागपूर मतदार संघ, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष)
ह्या सर्व चाली भाजपचा विकृत मेंदू खेळतो आहे, आता तुम्ही बकरे आहात, नमुन राहा नाहीतर खाल्ले जाल.
आत्ताच तुमच्या एकनाथ शिंदे यांना बोलताना फडणवीस माईक हातातून काढून घेतात तर गिरीश महाजन तोंडावर पेपर ठेवून एकनाथ शिंदे यांनी काय बोलावं हे सांगत असतात.
तुमची स्वतःची भाषा लायकी किंवा प्रतिष्ठा काही आहे की नाही.
प्रमोद शिंदे
9967013336
(जास्तीस जास्त फॉरवर्ड करा )

रावण रावण आणि रावण

"रावण रावण आणि रावण"
मित्रांनो दसरा आला की पून्हा एकदा रावण विषयावर चर्चा सुरू झालीय, त्यातच काही विकृत मेंदूनी आदिपुरुष नामक चित्रपट प्रदर्शित करून रावणाला यवनी रूप देण्याचा खोडसाळ प्रयत्न केलाय.
काही महिन्यांपूर्वी मी यावर लिखाण केले होतें, मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील आठनेर गावांत गेल्यावर तेथील गोंड समाजातील लोकं आणि त्यांचे रावणाशी नाते यावर मी लिहलं होतं, तिकडे होळीच्या दिवशी मेघनाथ महोत्सव साजरा करतात, असे लिहले होतें आता याचं समर्थन करणारे पुरावे मला आपल्या महाराष्ट्रातचं सापडलेत, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यात, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात, तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात फिरताना व तेथील आदिवासी समाजाशी बोलताना हे पुरावे सापडतात.
यात हेही परत एकदा सर्वार्थाने मान्य झाले की आदिवासी हा स्वतःला हिंदू समजतंच नाही, त्यांचा मूळ धर्म गोंड आहे, त्यात त्यांच्या त्यांच्या अनेक जमाती आहे.
त्यातीलच गोंड प्रधान समाज रावणाला स्वतःचा मूळ पुरुष मानतो, यातील मोठा सुशिक्षित वर्ग सध्या रावण दहनाला विरोध करतोय. त्यांच्या मते आर्याच्या आक्रमणानंतर रावण पुत्र म्येगनादो (मेघनाथ हा अपब्रँश आहे.) याने आर्य नेता इंद्र याला हरवले म्हणून यास इंद्रजित हे नाव पडले. आजही साक्री तालुक्यातील बारीपाडा या गावात राहणाऱ्या मावची, कुकणी आणि भिल्ल हा समाज हनुमानाला आपला मूळ पुरुष मानतो व फक्त त्याचीच पूजा करतो, त्यांच्या मते आमच्या या डोंगरात सगळ्या प्रकारच्या औषधी सापडतात. तर अहिल्या शिळा देखील आमच्या या जंगलात आहे, जवळच 4 किलोमीटर वर गाव आहे, वाल्मिकी हा मूळ याच भागातला असल्याचे सांगितले जाते, अगदी नाशिक मध्ये गोदावरी खोऱ्यात सीता कुटी असल्याचे दिसते.
यासर्व पुराव्यावरून असेच दिसते की मुंड समाजातील राम, व गोंड प्रधान समाजातील रावण यांचा कुठेहीं श्रीलंकेशी संबंध नाहीय, तर ते इथलेच म्हणजेच महाराष्ट्र,  मध्य प्रदेश छत्तीसगड, बिहार, झारखंड या भागातील आहे, काही इतिहासकार यांच्या मतानुसार वाल्मिकी रामायण इ. स. 5 व्या शतकात लिहले गेलेय व रावणाची लंका हीं मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात आहे.
तर मुंड समाजातील रामाने आर्य नेता परशु याचा कानपुर येथे पराभव केला, तर रावण पुत्र म्येगनादो याने इंद्रजित चा पराभव केला. हे खरे क्रांतिकारी होतें जे आर्य आक्रमणाविरुद्ध लढत राहिले.
शेवटी गडचिरोली शहरात राहत असलेल्या एका गोंड प्रधान समाजातील शहरीकरण झालेल्या एका महिलेशी आजच्या कथित राम रावण वैरावर मी चर्चा केली अशी होती.
मी : तू गोंड प्रधान?
ती : हो
मी : तुमचा रावणाचा काय संबंध?
ती : आमचा कुळ दैवत, म्हणजेच मूळ पूर्वज, पण आम्ही त्यांना नाही मानत? (अगदी शरमेने सांगत होती.)
मी : का?
ती : त्याने केलं ते चूक होतं?
मी : काय चुकलं त्याचं?
ती : सीतेला पळवायला नको होतं.
मी : मग राम आणि लक्ष्मण यांनी केलं ते चांगलं होतं का? त्याच्या बहिणीचे म्हणजे शूर्पनखेंचे कान आणि नाकं कापले, ते बरोबर होतं का?
ती : तिने पण चूक केली ना?
मी : काय चूक केली? आपलं लक्ष्मनावर प्रेम जडलंय आणि ते तिने व्यक्त केलं, ते चूक आहे का?
ती : ते आज चालतं, पूर्वी नाही ना?
मी : असं कसं, परत त्या काळात स्त्रीला अधिकार होतें, यातूनच स्वयंवर निर्माण झाले ना, स्त्रियांना नवरा निवडायचा अधिकार होता.
उलट राम लक्ष्मनाने चूक केली, एखाद्याने प्रपोस केल्यावर सरळ नकार देता येवू शकत होता, तर नाक कान कापून तिला विद्रुप केले तर रावण सुध्दा हे करू शकत होता, सीतेचे हात पाय कान नाकं कापू शकून बदला घेवू शकत होता, पण त्याने सीतेला स्पर्श न करता पळवून आणले सन्मानाने ठेवले, राम लक्ष्मण येतील तिला शोधत व माफी मागतील याच उद्देशाने, मग इथे कोण चुकीचा!
ती : हम्म (शांत)
मी : नको त्या चुकीच्या कथावर विश्वास ठेवू नका, या सगळ्या खोट्या कथा आहेत, तुमच्या पूर्वज्यांचा अभिमान बाळगा, त्यांच्या शौर्याचे धडे पोरांना शिकवा.
ती : शांत (जाताना माझ्यासोबत फोटो घेण्याचा आग्रह केला, आम्ही तो काढला.)
- प्रमोद शिंदे
9967013336
(जास्तीत जास्त फॉरवर्ड करा.)

Wednesday, November 24, 2021

गावाकडच्या गोष्टी : भाग 6

गावाकडच्या गोष्टी : भाग 6

दृश्य  : एका जिल्हापरिषद शाळेतील प्रसंग, आजच्या पेपरात आलेल्या बातमीवरून शिक्षकाने मुलांना एक प्रश्न विचारलेला होता.

गुरुजी : मुलांनो सांगा पाहू, "उद्योगपती गौतम अडाणी आणि अनिल अंबानी यांनी 2014 ला कश्यात गुंतवणूक केली असेल, ज्यामुळे या सात वर्षात यांची संपत्ती 200 पटीने वाढली?"
सगळी मुलं एकत्र : गुरुजी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात
गुरुजी : अरे वाह... कसं बरं सांगा पाहू
बंड्या : गुरुजी 2014 च्या निवडणुकीत आपले प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी देशभर फिरण्यासाठी उद्योगपती गौतम अडाणी यांचं खाजगी विमान वापरलं होतं.
गुरुजी : अरे वाह, अजून एखादं उदाहरण
राघू : गुरुजी मि सांगतो मी सांगतो... आणि या प्रचार सभेचा सर्व खर्च आणि EVM मशीन मध्ये गडबड घोटाळा करण्याचा खर्च उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केला होता.
गुरुजी : हेरे तुला कोणी सांगितलं?
राघो : सर यावर युट्युब वर एक स्टोरीच प्रसिद्ध झाली होती.
गुरुजी : अरे मग याचा आणि त्या दोघांची संपत्ती वाढण्याचा काय संबंध?
लक्षी :  याच्या बदल्यात आपले प्रधानमंत्री निवडून आल्यावर जेंव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर गेले तेंव्हा त्यांनी आपल्या सोबत उद्योगपती अडाणी आणि अंबानी यांना आपल्या सरकारी विमानातून सोबत नेलं.
विजी : आपल्याला सांगितलं प्रधानमंत्री परदेशीं गुंतवणूक आणायला बाहेर फिरत्यात पण या सात वर्षात एकबी पैसा आपल्या देशात नाय आला, पर या अडाणी आणि अंबानीचा पैसा आणि कंपन्या जगातल्या सगळ्याचं देशात उभ्या राहिल्या  की!
गुरुजी : आता हे कुठून शोधून काढलं?
मन्या : गुरुजी या दोघांच्या कंपन्या 2014 नंतर कुठं कुठं उभं राहिल्या हे समदंच त्यांच्या वेबसाईट वर दिसतंय की?
विक्या : अनं गुरुजी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या मुकेश अंबानी च्या jio ची पार जाहिरात केली की? समद्या पेपर मधी या या मोठल्या जाहिराती, त्यात प्रधानमंत्री मोदी सांगत हुते jio घ्या म्हून, आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतायेत मग काय घेतली की आम्ही समद्यानी!
रानीं : अनं आपल्या देशाच्या समद्या कंपन्या यात एअरपोर्ट, रेल्वे, ONGC अशा या 40 कंपन्या या उद्योगपती गौतम अडाणी आणि अनिल अंबानी यांना स्वस्तात विकल्या की!
भिड्या : रागावत, ये विकल्या नाय चालवायला दिल्यात 90 वर्षासाठी!
रानी : गुरुजी मला सांगा, आता ह्यो 14 वर्षाचा हाय, नव्वद वर्षांनी हा किती वर्षाचा असलं?
गुरुजी : 104 वर्षाचा
रानी : बरोबर नां,  मग ह्यो 104 वर्षाचा असताना आसल का बघायला? याची नातवंड असतील पतवंड असतील, त्यांना काय माहिती? ती काय करणार?
 आपट्या : अरे नरेंद्र मोदी यांनी किती किती चांगली कामं केलीत, जसं 370 हटवलं, तीन तलाक कायदा रद्द केला, उरी आणि पुलवामा मधी किती दहशतवादी मारले... अनं अनं सरदार वल्लभभाई यांचा किती मोठा पुतळा बांधला!
बंड्या : बरोबर आहे  गुरुजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक चांगली कामं केलीत, या उद्योगपती अडाणी आणि अंबानी यांना जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अगदी पुढं नेलं, त्यामुळे भारताची मान किती उंचावली, 370 मूळे या या भिड्या, आपट्या अनं  आम्हाला काय भी फायदा झाला नाय तरी उद्योगपती गौतम अडाणी अनं मुकेश अंबानी यांच्या कंपन्या जम्मू आणि काश्मीर मध्ये उभ्या राहिल्या.
विक्या : आमच्या दारात संडासं आली, पण संडासासाठी पाणी लय लागतंय म्हून आम्ही उघड्यावर जातं असलो म्हणून काय झालं? दारात संडासं तर आली. आता पानीं मिळल तवा वापरू की आम्ही!
चिंध्या : गुरुजी हे सगळे देशद्रोही आहेत, तुम्हाला देशाचे प्रधानमंत्री पटत नसतील तर जावा हा देश सोडून तुमच्या पाकिस्थानात!
रानी : गुरुजी, आमचे देशाचे प्रधानमंत्री ज्या पाकिस्थानात बिर्याणी खायला गेले होतें याचा आम्हाला अभिमान आहे, बिर्यानी खावी तर पाकिस्थान ची, जगासमोर किती मोठं उदाहरण ठेवलं प्रधानमंत्री मोदी यांनी!
विक्या : गुरुजी माझे आबा सांगत हुते त्यांचे बाबा स्वतंत्र लढ्यात हुते!
बंड्या : माझे आबा तर डॉ. बाबासाहेब यांच्या भाषणाला ऐकायला बाबासाहेब यांच्या मागं समदी कडे जातं हुते!

(अशा रीतीने वर्ग संपला, सगळी मुलं मुली आपल्या कामाला गेली,
बंड्या बापाला मदत करायला शेतात गेला.
विक्या बापाच्या न्हाव्या च्या दुकानात केस कसे कापायचे हे शिकायला गेला.
लक्षी, विजी आणि रानी धावत धावत घरी गेल्या, आज गावात आठवड्यानं पाण्याचा टेंकर येणार होता. पाणी भरायला हवं म्हणून पळाल्या.
राघो तालुक्यात बाजाराला गेला, सकाळपासून त्याची आई मातीची भांडी अनं मडकी विकायला बसली होती, आता राघो तिकडे जाणार आणि  आईला घरी जेवण बनवायला पाठवून स्वतः त्या विकायला बसणार!
मन्या सकाळी रानात चरायला सोडलेली गुरं बघायला गेला.
भिड्या घरी जाऊन टीव्ही लावून अर्णव गोस्वामी आज काय बोलतोय हे बघत बसला.
आपट्या संघाच्या शाळेतजाऊन आज कोण देशद्रोही भेटलं आता यांना कसं संपवायचं याचं नियोजन करू लागला.
चिंध्या मंदिरात गेला आज त्याचे  वडील त्याला सत्यनारायण पूजा कशी घालावी हे शिकविणार होतें.

- प्रमोद शिंदे  मुंबई (9967013336)
आवडल्यास नक्की शेअर करा.

Saturday, August 15, 2020

आज म्हणे स्वातंत्र्य दिन, देश स्वातंत्र्य झालाय

आज भारताचा स्वातंत्र्यदिन, मुंबईत असलो की, कुठे ना कुठे, व्याख्यानाला किंवा झेंडावंदनाला जात असे, पण लॉकडाऊन आणि शहरापासून दूरवर आज कसा करावा स्वातंत्र्य दिन साजरा असा विचार करत असताना, डोक्यात काही शब्द सुचले, पुढे ते वाढत मनसोक्त झाले, 
आणि खालील पंक्ती तयार झाल्या... आवडल्यास नक्कीच कळवा..

आज म्हणे स्वातंत्र्य दिन, 
देश स्वातंत्र्य झालाय, 

ये गण्या उठ, तयार हो, 
साळत जायचं,  
झेंडावंदन हाय ना शाळंत? 
ही बघ कापडं, 
ये आये,  
चड्डी ढुंगणावर फाटलीय, 
शर्ट पन उसवलाय, 
अरे जा, तुझ्या ढुंगणाच्या चड्डीला कोण  नाय बघत, 
सगळे झेंड्याला बघत्यात, 
जा, आज स्वातंत्र्यदिन हाय, 
देश स्वतंत्र झालाय, 

ये लक्ष्मणा उठ, 
चल लवकर चल, 
रातच्याला मयंदाळ पाऊस झालाय, 
सगळं बांध फुटलेत, 
पिकं पाण्यात गेलीत, 
चल लवकर चल, 
शेतातून पाणी काढाय हव,
नव्याने बांध बांधायला हवं, 
उठतो रे आबा,
हा सकाळ सकाळी भोंगा कसला? 
गाणं वाजतंय, मेरे देश की धरती..
अरे आज स्वातंत्र्य दिन हाय, 
देश स्वतंत्र झालाय नवं 

ये कांते काय झालं, 
काय नाय!
अगं बोल, 
कालचा कस्टमर, मादरचोद 
रातभर सगळं काय केलं, 
पैसं मांगल्यावर मारलं कुत्र्यानं, 
खूपच लागलंय, 
थांब हळद लावते, 
जाऊदे आपली जिंदगीच अशी हाय, 
हे घे खा !
सुखा मेवा अन बर्फी, 
कशा बद्दल, कोणी दिलंय? 
आमदार सायबानी दिलंय, 
आज स्वातंत्र्य दिन है, 
देश स्वतंत्र झालाय ना!

ये बैला,
बघ तात्या कसा झोपलाय,
अन काकू का रडतेय? 
ये बैला, झोपला नाय, मेलाय तो 
पाऊस नाय, शेती नाय, 
रातच्यालाच झाडाला लटकलाय, 
मग आता पुढं? 
काकू तुला इकल, मला इकल,  
रस्त्याच्या सिग्नलवर पोरं पाठीला बांधून झेंडा पन इकल, 
झेंडा काय असतो रे?  
तुला एवढं पन माहिती नाय का बैला, 
आज स्वातंत्र्य दिन हाय, 
देश स्वतंत्र झालाय !

तुझ्या कर्जाचा हफ्ता नाय आला, 
साहेब बँकेत चोरी....
मुर्खा, मी काय विचारतोय अन, 
तुला बँकेत चोरी कशाला पाहिजे? 
आमचे पेपर चोरीला नाय गेले काय? 
पेपर कुठे जातील, अन चोरी कसली? 
समदे म्हणत्यात चोरी झाली, 
त्या रफाळा चे पेपर चोरले, 
त्या दारूवाल्या माल्या चे पेपर चोरले, 
त्या पुलवामा च्या सैनिकांचे पेपर चोरले, 
आमचे काहून सोडले त्या चोरानं? 
ते मला नको विचारूस, 
हफ्ता भर, 
सकाळी शाळेच्या पटांगणात ये, 
झाडलोट करायचीय, 
आज स्वातंत्र्य दिन हाय, 
देश स्वतंत्र झालाय, 

हो आज स्वातंत्र्य दिन हाय, 
देश स्वतंत्र झालाय.

- प्रमोद शिंदे 
15/08/20
चंद्रपूर,

Tuesday, August 11, 2020

ये कृष्णा, ये कान्हा कोण रे तू?

कृष्णाला माझ्या नजरेतून पाहिल्यावर मला जसा कृष्ण  दिसला तसा मी खालील कवितेत मांडलाय. 

ये कृष्णा, ये कान्हा 
कोण रे तू? 
म्हणे तू विष्णूचा अवतार !
अरे हट 
तू विष्णूचा अवतार असूच शकत नाही, 
जो बायकोला पायाशी ठेवून जवा बघावं तेंव्हा कमळाच्या गादीवर  लोळत असलेला, 
तिने याचे पाय चेपत राहावे आणि हा दुनियेला दुनियादारी सांगत बसलेला, 
तू असा निष्क्रिय विष्णू असूच शकत नाही, 
तू तर गवळ्याच्या झोपड्यात बागडणारा नंदलाल, 
गुराढोरांच्या मागे  धावणारा गोपाल, 
दादा बलरामासोबत नांगर चालवणारा, 
शेती करणारा शेतकरी तू, 
दूध काढून घराघरात पोहचविणारा गवळी तू, 

काही नालायक कथाकारांनी आम्हाला सांगितले, 
तू आंघोळीला गेलेल्या गवळणीचे, 
कपडे पळवून नेत असे, 
अरे हट,
अरे ज्याने कोण कुठल्या द्रौपदीचे शील वाचविण्यासाठी, 
तीच्या अंगावर कापड टाकले, 
तो कान्हा आपल्याच गवळणीचे कपडे, 
पळवणारा असूच शकत नाही, 
तू तर जातिव्यवस्थेविरुद्ध दंड थोपटणारा, 
अठरा पगड जातीच्या गोपाळांना  
एकत्र करून काला करणारा, 
सहभोजनातून समतेसाठी आंदोलन करणारा, 
रोटी व्यवहारातून वर्णवादाविरुद्ध लढाच होता तो, 
अन जेंव्हा तुझ्या याच लढ्याविरुद्ध सनातन्यांनी हल्ले केल्यावर सगळं संकट स्वतः झेलत दीनाना छत्रछायेखाली घेणारा 
गिरीधर तू, 
तू सांगितलेले गीतेचे सार वाचलेय मी, 
त्यात तू कुठेही चमत्कार करतोस असे लिहले नाहीस, 
तू तर त्यातून, श्रम, कष्ट, संयम, स्त्री सन्मान आणि समानता हेच सांगतो आहेस, 

काही मूर्ख कथाकारांनी तुझ्यावर लिहलेल्या चमत्काराच्या कथा बाजूला सारल्या ना की तू, 
तू एक युगपुरुष वाटावा असाच आहेस, 
जिजाऊनी शिवरायांना सांगितलेला, 
मावळ्यांत मावळा म्हणून खेळणारा सवंगडी आहेस, 
तू अचल आहे, 
तू बुद्धांचा अहिंसावादी शांतीप्रिय 
रणछोड आहेस, 
तू बिहारच्या रानावनात राहणारा, 
आदिवासी "बांके बिहारीं" आहेस
नदी पाण्यात कोळ्यांसह बोटी वल्हवणारा "वल्लभ"आणि "कुंज बिहारीं" आहेस. 
तू दीनांचा बंधू " दीनबंधू" आहेस, 
तू काळ्या केसांचा "केशव"आहेस, 
तू काळ्या रंगाचा "काला' आहेस.
तू अन्याय अत्याचारा विरुद्ध उभा राहणारा "करिकालन"आहेस, 
तू पांडुरंग आहेस, 
तू आमचा आहेस, 
ये कृष्णा, ये कान्हा, 
तू आमचा आहेस.

- प्रमोद शिंदे 
11/08/20

Thursday, July 30, 2020

गावाकडच्या गोष्टी- भाग 1

गावाकडच्या गोष्टी- भाग 1
काल शेजाऱ्याकडे भांडण झालं, त्यावेळेस शेजारच्या निर्मला बाईंचे काही शब्द कानावर पडले, 

निर्मला बाई : आता ग बया,  काय करू मी? पुन्हयांदा तुम्ही ढोसून आलात, आलात तर आलात त्यात गावाला पैसे देतो म्हणून सांगून आलात.... हे माझ्या देवा.....आधीच म्या घरातली भांडी कुंडी विकून घर चालवतेय.... बँकत हुतं नव्हतं तेभी काढून घेतलं, आता काय करू मी......? 

शेठ :निर्मले,  तू गप्प बस, मी गावात माझ्या साठी पैसा गोळा करतोय ना?
 
निर्मला बाई: कुठं हाय पैसा?  किती पैसा? या आधी पण पुलवा मावशी च्या नावानं पैसा मागितला, समदा दारूत उडवला, आता परत गावात पैसा मागताय, तो पण उडवाल, ठावं नाय का मला? तुमचे बेवडे अन टवाळ दोस्त...

शेठ : निर्मले दोस्तांना मध्ये आणू नकोस, ते हायत म्हणून म्या हाय, त्यांना पाजतो,  हवं नव्ह ते देतो म्हणून म्या शेठ हाय !

निर्मला बाई : बरोबर हाय, नायतर कुत्र विचारणार नाय तुम्हाला!

शेठ :निर्मले तोंड बंद ठेव, नायतर (निर्मला बाई गप्प), जा गावात पैसा वाटायचं बघ, म्या तुझंच नाव सांगून आलोय, तूचं वाटशील म्हणून!

निर्मलाबाई : (कपाळावर हाथ मारत) आता गं माझे माय... आता काय राहिलंय बघते म्या विकायला!

-प्रमोद शिंदे 
गावाकडच्या गोष्टी

(या वरील भांडणाचा कोणत्याही मृत किंवा जीवित व्यक्तीशी, स्थळाशी, काळाशी संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)