Thursday, September 24, 2015

जत्रा मे फत्रा बिठाया |

 
सध्या जे तरुणामध्ये वेगळेच क्रेझ निर्माण झालय ....तिरुपतीला जाणे ,शिर्डीला पायी जाणे ,रात्रभर सिद्धिविनायकला आणि लालबागला जाणे याशिवाय अष्टविनायक , जगन्नाथ यात्रा आणि इतर धार्मीक स्थळे ...
हे ऐकले की संतानी केलेल्या कार्याची आठवण होते, संत गाडगे महाराज म्हणत "बापहो देवळात कायले जाता , देवळात देव राहीत नाही ,देवळात पुजार्याचे पोट राहते ."तुम्हाला जर देव भेटावा असे वाटत असेल तर तो तुम्हाला गरीबान मधे शोधा , त्यांच्या अंतरामध्ये शोधा ,पोराबाळांच्या शिक्षणामध्ये शोधा ". ... तर संत कबीर म्हणत ,
"जत्रा मे फत्रा बिठाया |
तीरथ बनाया पानी |
दुनीया भई दिवानी |
पैसो की धूलधानी || अशा या संताचे खरे कार्य झाकण्यासाठी अशा या नामदेव , ज्ञानेश्वर,आणि तुकाराम यांचे कार्यकर्तृत्व नाकारून या संताच्या नावावर जे दैवी चमत्कार जोडले गेले , जसे ज्ञानेश्वरानी भिंत चालीवली , पाठीवर मांडे भाजले,रेड्याच्या तोंडी वेद वदविले ...आणि तुकारामाच्या गाथा इंद्रायणीतून बाहेर आल्या , मुघल शिवरायाना संत तुकारामांच्या कीर्तनात पकडायला आले तर त्याना सगळीकडे शिवराय दिसत होते ...संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले , संत गोरा चे मुल परत जीवंत झाले'आणि "आपले बुद्धी शुन्य गेले चमत्कार बघून नमस्कार करायला". हे सर्व संत तुकडोजी महाराज याना सहन झाले नाही ,अशा वेळेस संत तुकडोजी महाराज ग्राम गीतेत म्हणतात ...
करावया चमत्कार | संत नोव्हेत जादूगार ||
संताचे खरे कार्य हे या भोळ्या भाबड्या समाजाला कर्मकांड आणि जाती द्वेषातून बाहेर काढणे हे होते. संत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज नामदेव -तुकारामांचा वारसा चालवीत होते . याबद्दल संत तुकडोजी महाराज आपल्या ग्राम गीतेत म्हणतात .
"वाईट भावना नासावया |
लोकी कर्त्यव्यशीलता यावया |
समाज सुस्थितीत नांदावया |
भजने केली संतानी ||

प्रमोद शिंदे
४ सप्टे. २०१५
 
 

No comments:

Post a Comment