Thursday, September 24, 2015

असे संत झाले काळी | तोंडी तंबाखूची नळी ||

 
गेल्या 6 महीन्यात महाराष्ट्रात शेतकर्यांच्या आत्महत्येचा आकडा दुप्पटीने वाढलाय ,आमच पंत सरकार शांत आहे , ते आपला पैसा कुंभमेळ्याच्या आंघोळी वाहीन्यांवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात खर्च करतय , आम्हा तरूणानी जागे होत ही भोंदूगीरी नाकारली असल्यामुळे कुंभमेळा फेल ठरतोय हे त्याना जाणवलेय .मग या पंत सरकारने अजुन पैसा ह्या कुंभमेळ्याच्या जाहीराती वाहीन्यावर करण्यात टाकला ,तरीही आपली कपटगीरी सफल होत नाही म्हटल्यावर राम कदम सारखे हनूमान 80 हजार लोकाना मोफत कुंभमेळा ...दर्शन करवण्यासाठी उतरवले. पंत सरकार तुम्ही आणि राम कदम तुम्ही हाच पैसा फक्त 800 शेतकर्यानी दुबार पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडी साठी वापरला असता असता तर तुम्हाला नक्की मान मिळाला असता (तुमच्या शब्दात पुण्य मिळाले असते ) .पण तुम्ही जे करताय त्यानी फक्त तुम्ही कपटी असल्याचे दिसून येते.तुम्ही खर्च पण करताय कोणासाठी ?
संत तुकारामांनी म्हंटलेलच आहे...
असे संत झाले काळी | तोंडी तंबाखूची नळी ||
स्नान संध्या बुडविली | पुढे भांग ओढविली ||
भांग भुरका हे साधन | पची पडे मध्येपान ||
तुका म्हणे अवघे सोंग | तेथे कैसा पांडूरंग ||
(अर्थ -अगदी सोपा आहे .)
-प्रमोद शिंदे                                                                                                     
 १४ सप्टे. २०१५

No comments:

Post a Comment