प्रजासत्ता की धर्मसत्ता
२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला . ज्याला आपण गणतंत्र दिवस असेही बोलतो . प्रजासत्ताक किंवा गणतंत्र या शब्दाचा अर्थ होतो प्रजेचे सत्ता , या भारतात राहणाऱ्यांची सत्ता होय . २६ जानेवारी १९५० पूर्वी भारतात इंग्रजांची सत्ता होती . १५ ऑगस्ट १९४७ ला जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले असे आपण म्हणतो तरी २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचे नाव “ब्रिटीश डोमिनियन इंडिया “ म्हणजेच “इंग्रज आधिपत्याखालील भारत” असेच होते . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचे राष्ट्रगीत “ God save the King” हेच होते . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारतात इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करताना निर्माण केलेला सामंजस्य करार ज्याला “ भारतीय स्वातंत्र्यता कायदा १९४७” हाच लागू होता . २६ जानेवारी १९५० पासून भारतात भारतीय संविधानानुसार प्रजासत्ताक कारभार सुरु झाला. भारताचे नाव भारत असे घोषित झाले . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारतात इंग्रजांची सत्ता होती असे जरी आपण म्हटल, तरी भारतीय जनमानसावर आणखीन एक सत्ता हुकुम गाजवत होती ती म्हणजे धर्मसत्ता, धर्माच्या नियमांची सत्ता , स्वतःला धर्म प्रमुख म्हणवनाऱ्यांची सत्ता होती, अशी नियमावली जिला बहुसंख्येने असलेले हिंदू “मनुस्मृती” म्हणत तर अल्पसंख्य मुस्लीम “हदीस” म्हणत. हि सत्ता हजारो वर्षापासून सुरु होती यात वर्णा नुसार , जातीनुसार लोकांनी कार्य करावे . प्रत्येक वर्णाच्या लोकांनी त्यांचे त्यांचे नेमून दिलेले म्हणजेच उच्च वर्णीयांच्या सेवेचे काम करावे , “मनुस्मृतीनुसार” ब्राम्हण हा सगळ्यात उच्च स्थानी याने शिक्षण घ्यावे , पूजा कराव्यात, याला कोणीही शिक्षा करू शकत नाही याच्याकडे वर मान करून कोणीही बघू नये अगदी राजा किंवा यांच्या आईने, बायाकोनेही नाही. या नंतर खालोखाल क्षत्रिय याने राज्य कारभार सांभाळावा, ब्राम्हणांच्या नियमानुसार राज्य चालवावे ब्राम्हण सोडून इतरांना शिक्षा द्याव्यात . त्या खालोखाल येतो वैश्य म्हणजेच व्यापारी समाज याने व्यापार करावा , आणि पैसा जमा करावा आणि तो धार्मिक कार्यासाठी ब्राम्हणांना द्यावा. आणि सगळ्यात शेवटी अगदी तळाला येतो शुद्र आणि अति शुद्र यांनी या वरील तिन्ही समाजाची सेवा करावी , याच्याकडे पाणी भरावे ,यांची घाण उचलावी यांच्यासाठी शेती करून यांची पोटे भरावीत , ब्राम्हण म्हणतील त्या पूजा घालाव्यात, ब्राम्हण जेवण भरवावीत, अगदी जन्माला येण्या आधी गर्भसंस्कार , त्यानंतर नामकरण , तो तरुण झाल्यावर सुरक्षा पूजा , नंतर लग्न आणि मृत्यू आणि मृत्युनंतर हि दरवर्षी श्राद्ध पूजा प्रत्येक वेळेस ब्राम्हणाची गरज , म्हणजेच ब्राम्हणांच्या पोटापाण्याची सोय , असा हा अगदी “मनुस्मृती”चा लिखित कायदा होता , म्हणजेच धर्माची सत्ता होती. अगदी २६ जानेवारी १९५० पर्यंत ती संपूर्ण भारतभर लागू होती. २६ जानेवारी १९५० नंतर भारतात प्रत्येक भारतीय स्त्री आणि पुरुषाला स्वतःचे मत मांडण्याचा, व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला . त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. प्रत्येकाला बरोबरीची संधी प्राप्त झाली, त्यांना देशाचे नियम बनविण्याचा अधिकार प्राप्त झाला , , त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली, त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःचा प्रतिनिधी संसदेत पाठविण्याचा अधिकार मिळाला. संसदेत जावून स्वतःचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मिळाला , त्यांना समान न्याय मिळवण्याचा अधिकार मिळाला . संविधानानुसार स्वातंत्र्य , समता , सामाजिक न्याय , विज्ञान आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला . “मनुस्मृती” चे म्हणजेच धर्माचे नियम झुगारून तो शिक्षण घेवू लागला , ब्राम्हणाच्या बरोबरीने पंगतीला बसू लागला. तो डॉक्टर झाला , इंजिनियर झाला , आय . ए . एस झाला, आय . पी. एस . झाला , तो वकील आणि न्यायाधीश झाला . तो खासदार आणि आमदार झाला . हे सर्व साध्य झाल फक्त संविधानामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिण्यासाठी केलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या अथक प्रयत्नानामुळे शक्य झाले .
ह्याच काही गोष्ठी धर्म प्रमुखांना खुपू लागल्या , धर्माचे प्राबल्य आणि अधिकार संपले असले तरी धर्म संपले नव्हते . त्यांचे नियम लागू होत नव्हते तरी त्यांचे प्रमुख पद ब्राम्हणांकडे असावे, असे सर्व सम्मत झाले होते . याचाच फायदा ह्या धर्माच्या ठेकेदारांनी घेतला आणि आम्हीच संस्कृतीचे रक्षक आहोत, आणि इतर धर्मापासून आपल्या धर्माला, संस्कृतीला धोका आहे, धर्म संकटात आहे असे सांगत धर्माचा कारभार जास्त जोमाने सुरु केला , धार्मिक सणांचे महत्व वाढविले . नवीन नवीन धार्मिक प्रथा आणि धार्मिक पूजा सुरु केल्या. शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे ना मग शिक्षणातच धर्म घातला , गायत्री पठन , सरस्वती पूजा , गीता पठणाच्या स्पर्धा , दहीकाला उत्सव, आणि दिवाळी आणि गणपतीच्या सुट्ट्या सुरु केल्या , यामागे भारतीय कशाप्रकारे आयुष्यभर धार्मिक कार्यात व्यस्त राहील असे कारस्थान होते आणि ते त्यांनी साध्य केले . अगदी लोकांना संविधान आणि त्यातील मूल्य, कर्तव्ये आणि अधिकार कळू दिले नाहीत , या दिवसाचे महत्व कळू नये याची पुरेपूर सोय केली, आणि अगदी गेल्या दहा वर्षा पासून तर यांनी तर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजा सुरु केल्या. सर्व जनांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि बहुसंख्य प्रजेचे ज्यांच्यावर प्रेम आहे अशा छत्रपती शिवराय , ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेगळीच प्रतिमा निर्माण केली. शिवरायांना धर्म रक्षक तर ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्म विरोधी जाहीर केलं. यांच्या आनुयायात वाद निर्माण केले , आणि यांच्या जयंतीच्या दिवशी सत्यनारायण घालावे असे नवीन नियम तयार केले . अगदी सूत्रबद्ध पद्धतीने काम सुरु केले ह्यातून आज हि प्रजेची सत्ता नसून धर्माची सत्ता आहे हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. काहींचे म्हणणे यावर असे आहे कि या दिवशी सुट्टी असते सगळेव घरी असतात . म्हणून आम्ही पूजा घालतो, त्यांचे हेच म्हणणे हास्यास्पद वाटते . जगाच्या पाठीवर भारत हाच असा एकमेव देश आहे कि ज्यात वर्षाच्या ३६५ दिवसापैकी 22 सुट्ट्या ह्या आहेत ज्या शनिवार आणि रविवार सोडून येतात म्हणजेच एकूण ९६ आणि २२ अशा ११८ सुट्या आहेत मग ह्याच 4 दिवसांत सत्यनारायण घालण्याचे प्रयोजन काय? गेल्या ३ वर्षापासुन तर २६ जाने वारी च्या आदल्या रात्री म्हणजेच २५ जानेवारी च्या रात्री मोठ्याप्रमाणात भंडारा जेवण आणि धार्मिक मिरवणूक आयोजित करायची कि या प्रजेने सकाळी ध्वज वंदनेसाठी उठू नये, देशाभिमानासाठी तो उठला आणि त्याने ध्वज वंदन साजरे केले तरी त्याचे संपूर्ण लक्ष्य संध्याकाळी होणाऱ्या सत्यनारायण पूजे कडे असते ,कारण ती त्याच्यासाठी महत्वाची असते. शिवजयंती आणि आंबेडकर जयंती दिनी सत्यनारायण घालून शिवराय आणि आंबेडकर कळू न देणे . मित्रांनो अश्या प्रकारे प्रजेची सत्ता संपवून पुन्हा एकदा भारताला हिंदुस्थान घोषित करून धर्माची सत्ता लागु करण्याचा हा डाव आहे आणि आपल्या न करते पणामुळे, यांच्यावर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासामुळे तो यशस्वी होताना दिसत आहे . माझी आपण सर्वांना हीच विनंती आहे कि आपण आपला धर्म स्वतः ठेवावा , तो साजरा करावा पण १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी , २६ जानेवारी या प्रजा सत्ताक दिनी , आणि देश हित साठी आणि समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी जागवण्याच्या दिवशी कोणतीही पूजा घालू नये , कारण या सर्वांनी कधीही धर्मासाठी लढाया केल्या नाहीत, यांनी स्वतः आपला धर्म घरात ठेवून देश हितासाठी , समाज परिवर्तनाचे कार्य केले . या दिवशी धार्मिक पूजा घालणे म्हणजेच देशाचा आणि या महापुरुषांचा अपमान होईल. शेवटी आपल्यालाच ठरवावे लागेल कि आपल्याला आपल्या देशात काय हवय? प्रजासत्ता कि धर्मसत्ता?
-प्रमोद शिंदे
२२ जून २०१५
२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला . ज्याला आपण गणतंत्र दिवस असेही बोलतो . प्रजासत्ताक किंवा गणतंत्र या शब्दाचा अर्थ होतो प्रजेचे सत्ता , या भारतात राहणाऱ्यांची सत्ता होय . २६ जानेवारी १९५० पूर्वी भारतात इंग्रजांची सत्ता होती . १५ ऑगस्ट १९४७ ला जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले असे आपण म्हणतो तरी २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचे नाव “ब्रिटीश डोमिनियन इंडिया “ म्हणजेच “इंग्रज आधिपत्याखालील भारत” असेच होते . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचे राष्ट्रगीत “ God save the King” हेच होते . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारतात इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करताना निर्माण केलेला सामंजस्य करार ज्याला “ भारतीय स्वातंत्र्यता कायदा १९४७” हाच लागू होता . २६ जानेवारी १९५० पासून भारतात भारतीय संविधानानुसार प्रजासत्ताक कारभार सुरु झाला. भारताचे नाव भारत असे घोषित झाले . २६ जानेवारी १९५० पर्यंत भारतात इंग्रजांची सत्ता होती असे जरी आपण म्हटल, तरी भारतीय जनमानसावर आणखीन एक सत्ता हुकुम गाजवत होती ती म्हणजे धर्मसत्ता, धर्माच्या नियमांची सत्ता , स्वतःला धर्म प्रमुख म्हणवनाऱ्यांची सत्ता होती, अशी नियमावली जिला बहुसंख्येने असलेले हिंदू “मनुस्मृती” म्हणत तर अल्पसंख्य मुस्लीम “हदीस” म्हणत. हि सत्ता हजारो वर्षापासून सुरु होती यात वर्णा नुसार , जातीनुसार लोकांनी कार्य करावे . प्रत्येक वर्णाच्या लोकांनी त्यांचे त्यांचे नेमून दिलेले म्हणजेच उच्च वर्णीयांच्या सेवेचे काम करावे , “मनुस्मृतीनुसार” ब्राम्हण हा सगळ्यात उच्च स्थानी याने शिक्षण घ्यावे , पूजा कराव्यात, याला कोणीही शिक्षा करू शकत नाही याच्याकडे वर मान करून कोणीही बघू नये अगदी राजा किंवा यांच्या आईने, बायाकोनेही नाही. या नंतर खालोखाल क्षत्रिय याने राज्य कारभार सांभाळावा, ब्राम्हणांच्या नियमानुसार राज्य चालवावे ब्राम्हण सोडून इतरांना शिक्षा द्याव्यात . त्या खालोखाल येतो वैश्य म्हणजेच व्यापारी समाज याने व्यापार करावा , आणि पैसा जमा करावा आणि तो धार्मिक कार्यासाठी ब्राम्हणांना द्यावा. आणि सगळ्यात शेवटी अगदी तळाला येतो शुद्र आणि अति शुद्र यांनी या वरील तिन्ही समाजाची सेवा करावी , याच्याकडे पाणी भरावे ,यांची घाण उचलावी यांच्यासाठी शेती करून यांची पोटे भरावीत , ब्राम्हण म्हणतील त्या पूजा घालाव्यात, ब्राम्हण जेवण भरवावीत, अगदी जन्माला येण्या आधी गर्भसंस्कार , त्यानंतर नामकरण , तो तरुण झाल्यावर सुरक्षा पूजा , नंतर लग्न आणि मृत्यू आणि मृत्युनंतर हि दरवर्षी श्राद्ध पूजा प्रत्येक वेळेस ब्राम्हणाची गरज , म्हणजेच ब्राम्हणांच्या पोटापाण्याची सोय , असा हा अगदी “मनुस्मृती”चा लिखित कायदा होता , म्हणजेच धर्माची सत्ता होती. अगदी २६ जानेवारी १९५० पर्यंत ती संपूर्ण भारतभर लागू होती. २६ जानेवारी १९५० नंतर भारतात प्रत्येक भारतीय स्त्री आणि पुरुषाला स्वतःचे मत मांडण्याचा, व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला . त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. प्रत्येकाला बरोबरीची संधी प्राप्त झाली, त्यांना देशाचे नियम बनविण्याचा अधिकार प्राप्त झाला , , त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली, त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःचा प्रतिनिधी संसदेत पाठविण्याचा अधिकार मिळाला. संसदेत जावून स्वतःचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मिळाला , त्यांना समान न्याय मिळवण्याचा अधिकार मिळाला . संविधानानुसार स्वातंत्र्य , समता , सामाजिक न्याय , विज्ञान आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला . “मनुस्मृती” चे म्हणजेच धर्माचे नियम झुगारून तो शिक्षण घेवू लागला , ब्राम्हणाच्या बरोबरीने पंगतीला बसू लागला. तो डॉक्टर झाला , इंजिनियर झाला , आय . ए . एस झाला, आय . पी. एस . झाला , तो वकील आणि न्यायाधीश झाला . तो खासदार आणि आमदार झाला . हे सर्व साध्य झाल फक्त संविधानामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिण्यासाठी केलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या अथक प्रयत्नानामुळे शक्य झाले .
ह्याच काही गोष्ठी धर्म प्रमुखांना खुपू लागल्या , धर्माचे प्राबल्य आणि अधिकार संपले असले तरी धर्म संपले नव्हते . त्यांचे नियम लागू होत नव्हते तरी त्यांचे प्रमुख पद ब्राम्हणांकडे असावे, असे सर्व सम्मत झाले होते . याचाच फायदा ह्या धर्माच्या ठेकेदारांनी घेतला आणि आम्हीच संस्कृतीचे रक्षक आहोत, आणि इतर धर्मापासून आपल्या धर्माला, संस्कृतीला धोका आहे, धर्म संकटात आहे असे सांगत धर्माचा कारभार जास्त जोमाने सुरु केला , धार्मिक सणांचे महत्व वाढविले . नवीन नवीन धार्मिक प्रथा आणि धार्मिक पूजा सुरु केल्या. शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे ना मग शिक्षणातच धर्म घातला , गायत्री पठन , सरस्वती पूजा , गीता पठणाच्या स्पर्धा , दहीकाला उत्सव, आणि दिवाळी आणि गणपतीच्या सुट्ट्या सुरु केल्या , यामागे भारतीय कशाप्रकारे आयुष्यभर धार्मिक कार्यात व्यस्त राहील असे कारस्थान होते आणि ते त्यांनी साध्य केले . अगदी लोकांना संविधान आणि त्यातील मूल्य, कर्तव्ये आणि अधिकार कळू दिले नाहीत , या दिवसाचे महत्व कळू नये याची पुरेपूर सोय केली, आणि अगदी गेल्या दहा वर्षा पासून तर यांनी तर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजा सुरु केल्या. सर्व जनांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि बहुसंख्य प्रजेचे ज्यांच्यावर प्रेम आहे अशा छत्रपती शिवराय , ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेगळीच प्रतिमा निर्माण केली. शिवरायांना धर्म रक्षक तर ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्म विरोधी जाहीर केलं. यांच्या आनुयायात वाद निर्माण केले , आणि यांच्या जयंतीच्या दिवशी सत्यनारायण घालावे असे नवीन नियम तयार केले . अगदी सूत्रबद्ध पद्धतीने काम सुरु केले ह्यातून आज हि प्रजेची सत्ता नसून धर्माची सत्ता आहे हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. काहींचे म्हणणे यावर असे आहे कि या दिवशी सुट्टी असते सगळेव घरी असतात . म्हणून आम्ही पूजा घालतो, त्यांचे हेच म्हणणे हास्यास्पद वाटते . जगाच्या पाठीवर भारत हाच असा एकमेव देश आहे कि ज्यात वर्षाच्या ३६५ दिवसापैकी 22 सुट्ट्या ह्या आहेत ज्या शनिवार आणि रविवार सोडून येतात म्हणजेच एकूण ९६ आणि २२ अशा ११८ सुट्या आहेत मग ह्याच 4 दिवसांत सत्यनारायण घालण्याचे प्रयोजन काय? गेल्या ३ वर्षापासुन तर २६ जाने वारी च्या आदल्या रात्री म्हणजेच २५ जानेवारी च्या रात्री मोठ्याप्रमाणात भंडारा जेवण आणि धार्मिक मिरवणूक आयोजित करायची कि या प्रजेने सकाळी ध्वज वंदनेसाठी उठू नये, देशाभिमानासाठी तो उठला आणि त्याने ध्वज वंदन साजरे केले तरी त्याचे संपूर्ण लक्ष्य संध्याकाळी होणाऱ्या सत्यनारायण पूजे कडे असते ,कारण ती त्याच्यासाठी महत्वाची असते. शिवजयंती आणि आंबेडकर जयंती दिनी सत्यनारायण घालून शिवराय आणि आंबेडकर कळू न देणे . मित्रांनो अश्या प्रकारे प्रजेची सत्ता संपवून पुन्हा एकदा भारताला हिंदुस्थान घोषित करून धर्माची सत्ता लागु करण्याचा हा डाव आहे आणि आपल्या न करते पणामुळे, यांच्यावर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासामुळे तो यशस्वी होताना दिसत आहे . माझी आपण सर्वांना हीच विनंती आहे कि आपण आपला धर्म स्वतः ठेवावा , तो साजरा करावा पण १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी , २६ जानेवारी या प्रजा सत्ताक दिनी , आणि देश हित साठी आणि समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी जागवण्याच्या दिवशी कोणतीही पूजा घालू नये , कारण या सर्वांनी कधीही धर्मासाठी लढाया केल्या नाहीत, यांनी स्वतः आपला धर्म घरात ठेवून देश हितासाठी , समाज परिवर्तनाचे कार्य केले . या दिवशी धार्मिक पूजा घालणे म्हणजेच देशाचा आणि या महापुरुषांचा अपमान होईल. शेवटी आपल्यालाच ठरवावे लागेल कि आपल्याला आपल्या देशात काय हवय? प्रजासत्ता कि धर्मसत्ता?
-प्रमोद शिंदे
२२ जून २०१५
No comments:
Post a Comment