क्रांतीची लढाई कधीही थांबणार नाही .....
काही वर्षापूर्वी रंग दे बसंती नावाचा एक चित्रपट आलेला होता, चित्रपटाच्या शेवटी एक अतिशय सुंदर गाणे आहे, “रूबरू” या गाण्याच्या सुरवातीला एक शेतातले दृश्य आहे. “ एक व्यक्ती शेतात रोपटं लावतोय आणि एक लहान मुल जवळ येवून त्याला विचारतय “पापाजी तुम ये क्या कर रहे हो? यावर तो व्यक्ती म्हणतो “ आम बो रहा हु पुतर,” यावर लहान मुल म्हणते “क्यो?”, तर ती व्यक्ती म्हणते, “एक आम बोवोगे तो लाखो पाओगे”. ह्या दृश्याचा अर्थ जरी अगदी साधा निघत आला असला तरी ह्या दृश्यावरून मला आजच्या परिस्थितीवर भाष्य करावेसे वाटते. ते असे कि, नुकतीच कोल्हापुरात झालेली साहित्यिक आणि विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या , माणुसकीला आणि विचार स्वातंत्र्यचा गळा घोटणारी कृती, अगदी दीड वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे साहित्यिक आणि विचारवंत नरेंद्र दाभोळकरांची अशीच हत्या घडवून आणण्यात आली. या दोघांचे कार्य आणि विचार आणि त्यांचे झालेले खून हे अगदी एकाच पद्धतीचे असल्याने, हे कोणी करून आणले असतील यावर सर्वांचे एकमत झालेले आहे. त्यांचे कार्य आणि विचार कोणाला नको होते ? ते कोणाला घातक वाटत होते? त्यामुळे कोणाचे नुकसान होणार होते? हे आपण सर्वच जन जाणतो. यावर अशा विचारस्वातंत्र्य नष्ट करू पाहणाऱ्या नतद्रष्टांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की भारतावर अनेक आक्रमणे झाली, हल्ले झाले पण आतापर्यंत कुणीही विचारांचा खुन करू शकलेला नाही. तुम्ही चार्वाक जाळून मारलात, ते गुन्हा तुम्ही स्वीकारत नाही, चार्वाकाच्या विचाराने प्रेरित होऊन गौतम बुद्ध जन्माला आला , भारताने जगाला गौतम बुद्ध दिला, तुम्ही गौतम बुद्ध मारलात, पण ती हत्याही तुम्ही स्वीकारली नाहीत पण याच गौतम बुद्धाला तुम्ही तुमच्या कपोलकल्पित अवताराच्या यादीत नेऊन बसवलात कारण गौतम बुद्ध मेल्यानंतरही तुम्हाला त्यांची भीती वाटते, कारण प्रत्येक सामान्य माणसात बुद्ध जिवंत राहिला , गौतम बुद्धांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा संत नामदेव , संत तुकाराम, संत रोहिदास, संत कबीर आणि संत गाडगे महाराज या अशा संतानी सुरु ठेवला, या संतानी भारतभर नवीन बुद्ध निर्माण केले, तुम्ही संत नामदेव , संत तुकाराम, संत रोहिदास, आणि संत कबीर यांचे खून केलेत. ते हि तुम्ही लपविलेत उलट याच संताच्या जीवनात चमत्कार घुसवून तुम्ही त्यांचे दैवीकरण करण्याचा खुळचट प्रयत्न केलात, पण या संतांच्या क्रांतिकारी विचाराने आणि प्रबोधनाने भारतात गुरुनानक , छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजे या सारखे मेंदू आणि मनगट बळकट असलेले नेतृत्व तयार झाले, गुरुनानाकांच्या आणि शिवरायांच्या वाणीने आणि संभाजी राजांनी लिहिलेल्या “ बुद्धभूषण” ह्या बुद्धांचा विचाराने भारतभर स्वाभिमानी मावळे निर्माण झाले . तर तुम्ही गुरुनानकाना देव बनविलेत आणि तुम्ही शिवरायांचाव व संभाजी राजांचा खून केलात आणि हे काळे कृत्यही लपवून ठेवलेत, तुम्हाला यांचीही भीती वाटली म्हणून खरे शिवराय आणि संभाजी राजे तुम्ही लपवून ठेवलेत आणि शिवरायांना धर्मरक्षक तर संभाजी राजांना बदनाम केलेत, आणि जेंव्हा तुम्हाला कळले कि हे लपविणे आता कठीण आहे तेंव्हा तुम्ही या छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर तुमचे निष्क्रिय गुरु बसवलेत. तरीही तुम्ही त्यांचे विचार आणि कार्य संपवू शकला नाहीत कारण सत्य कधीही अधिक काळ लपून राहत नाही, ते बाहेत येते आणि ते बाहेर आले , त्यांचा खरा वारसा ज्योतीराव फुले , छत्रपती शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे आणि अण्णाभाऊ साठे यांनी सुरु ठेवला. त्यांनी संपूर्ण भारत जागा केला एक नवीन भारत निर्माण केला, भारताला संविधान दिले, शोषित आणि वंचीताना शिक्षणाचा अधिकार दिला , शिवरायांच्या मावळ्यांमध्ये पुन्हा एकदा स्वाभिमान जागा केला, गल्लो गल्ली काना कोपऱ्यात “बुद्ध” निर्माण केले. तुम्ही त्यांच्यावरही मारेकरी धाडलेत, त्यांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या मारलेत, तुमचं हे काळ कृत्य दरवेळे प्रमाणे स्वीकारले नाहीत, उलट तुम्ही त्यांना आजही घाबरता म्हणून तर तुम्ही त्यांना जातीत बांधून ठेवलेत. कला , संस्कृती आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून त्यांना फक्त त्यांच्या जातीपुरतेच मर्यादित ठेवलेत. तरीहि या महापुरुषांचे प्रगतीकडे घेऊन जाणारे , जाती जातीतील दरी संपविणारे , देशाला एकसंघ ठेवणारे पुरोगामी आणि विज्ञानवादी विचार संपले नाहीत. उलट आज नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि त्यांच्यासारखेच अनेक विचारवंत आणि प्रबोधनकार तयार झालेत. आज तुम्ही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या केलीत. यावर मला तुम्हाला हेच सांगायचे आहे कि, तुम्ही त्यांच्या शरीरावर गोळीबार केलात, पण त्यांच्या विचारांवर गोळीबार करणारी बंदूक अजून निर्माण झालेली नाही, आणि भविष्यात तयार होऊ शकत त्यामुळे तुम्ही हा विचार सोडून द्या कि व्यक्ती मारल्याने त्याचे कार्य आणि विचारही मरतील तर हा तुमचा विचार मूर्खपणाचा आहे . नरेंद्र दाभोलकर , गोविंद पानसरे यांच्यासाखेच चार्वाक आणि बुद्धांचा वारसा पुढे नेणा ऱ्या आधुनिक संतानी आमच्या सारखेच लाखो “ बुद्ध” येथे तयार केलेत, आमच्या सारखे लाखो दाभोळकर आणि पानसरे काना कोपऱ्यात उभे केलेत, त्यात कोणाकोणाला मारणार तुम्ही? हि क्रांतीची, प्रगतीची लढाई न कधी थांबली होती न कधीही थांबणार नाही. उलट आम्ही आता अगदी जोमाने विचारांच्या तलवारी पाजळल्यात, त्यांना प्रगतीची धार दिलीय, क्रांतीच्या कार्याला जोमाने सुरवात केलीय.
प्रमोद शिंदे
११ जून २०१५
काही वर्षापूर्वी रंग दे बसंती नावाचा एक चित्रपट आलेला होता, चित्रपटाच्या शेवटी एक अतिशय सुंदर गाणे आहे, “रूबरू” या गाण्याच्या सुरवातीला एक शेतातले दृश्य आहे. “ एक व्यक्ती शेतात रोपटं लावतोय आणि एक लहान मुल जवळ येवून त्याला विचारतय “पापाजी तुम ये क्या कर रहे हो? यावर तो व्यक्ती म्हणतो “ आम बो रहा हु पुतर,” यावर लहान मुल म्हणते “क्यो?”, तर ती व्यक्ती म्हणते, “एक आम बोवोगे तो लाखो पाओगे”. ह्या दृश्याचा अर्थ जरी अगदी साधा निघत आला असला तरी ह्या दृश्यावरून मला आजच्या परिस्थितीवर भाष्य करावेसे वाटते. ते असे कि, नुकतीच कोल्हापुरात झालेली साहित्यिक आणि विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या , माणुसकीला आणि विचार स्वातंत्र्यचा गळा घोटणारी कृती, अगदी दीड वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे साहित्यिक आणि विचारवंत नरेंद्र दाभोळकरांची अशीच हत्या घडवून आणण्यात आली. या दोघांचे कार्य आणि विचार आणि त्यांचे झालेले खून हे अगदी एकाच पद्धतीचे असल्याने, हे कोणी करून आणले असतील यावर सर्वांचे एकमत झालेले आहे. त्यांचे कार्य आणि विचार कोणाला नको होते ? ते कोणाला घातक वाटत होते? त्यामुळे कोणाचे नुकसान होणार होते? हे आपण सर्वच जन जाणतो. यावर अशा विचारस्वातंत्र्य नष्ट करू पाहणाऱ्या नतद्रष्टांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की भारतावर अनेक आक्रमणे झाली, हल्ले झाले पण आतापर्यंत कुणीही विचारांचा खुन करू शकलेला नाही. तुम्ही चार्वाक जाळून मारलात, ते गुन्हा तुम्ही स्वीकारत नाही, चार्वाकाच्या विचाराने प्रेरित होऊन गौतम बुद्ध जन्माला आला , भारताने जगाला गौतम बुद्ध दिला, तुम्ही गौतम बुद्ध मारलात, पण ती हत्याही तुम्ही स्वीकारली नाहीत पण याच गौतम बुद्धाला तुम्ही तुमच्या कपोलकल्पित अवताराच्या यादीत नेऊन बसवलात कारण गौतम बुद्ध मेल्यानंतरही तुम्हाला त्यांची भीती वाटते, कारण प्रत्येक सामान्य माणसात बुद्ध जिवंत राहिला , गौतम बुद्धांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा संत नामदेव , संत तुकाराम, संत रोहिदास, संत कबीर आणि संत गाडगे महाराज या अशा संतानी सुरु ठेवला, या संतानी भारतभर नवीन बुद्ध निर्माण केले, तुम्ही संत नामदेव , संत तुकाराम, संत रोहिदास, आणि संत कबीर यांचे खून केलेत. ते हि तुम्ही लपविलेत उलट याच संताच्या जीवनात चमत्कार घुसवून तुम्ही त्यांचे दैवीकरण करण्याचा खुळचट प्रयत्न केलात, पण या संतांच्या क्रांतिकारी विचाराने आणि प्रबोधनाने भारतात गुरुनानक , छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजे या सारखे मेंदू आणि मनगट बळकट असलेले नेतृत्व तयार झाले, गुरुनानाकांच्या आणि शिवरायांच्या वाणीने आणि संभाजी राजांनी लिहिलेल्या “ बुद्धभूषण” ह्या बुद्धांचा विचाराने भारतभर स्वाभिमानी मावळे निर्माण झाले . तर तुम्ही गुरुनानकाना देव बनविलेत आणि तुम्ही शिवरायांचाव व संभाजी राजांचा खून केलात आणि हे काळे कृत्यही लपवून ठेवलेत, तुम्हाला यांचीही भीती वाटली म्हणून खरे शिवराय आणि संभाजी राजे तुम्ही लपवून ठेवलेत आणि शिवरायांना धर्मरक्षक तर संभाजी राजांना बदनाम केलेत, आणि जेंव्हा तुम्हाला कळले कि हे लपविणे आता कठीण आहे तेंव्हा तुम्ही या छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर तुमचे निष्क्रिय गुरु बसवलेत. तरीही तुम्ही त्यांचे विचार आणि कार्य संपवू शकला नाहीत कारण सत्य कधीही अधिक काळ लपून राहत नाही, ते बाहेत येते आणि ते बाहेर आले , त्यांचा खरा वारसा ज्योतीराव फुले , छत्रपती शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे आणि अण्णाभाऊ साठे यांनी सुरु ठेवला. त्यांनी संपूर्ण भारत जागा केला एक नवीन भारत निर्माण केला, भारताला संविधान दिले, शोषित आणि वंचीताना शिक्षणाचा अधिकार दिला , शिवरायांच्या मावळ्यांमध्ये पुन्हा एकदा स्वाभिमान जागा केला, गल्लो गल्ली काना कोपऱ्यात “बुद्ध” निर्माण केले. तुम्ही त्यांच्यावरही मारेकरी धाडलेत, त्यांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या मारलेत, तुमचं हे काळ कृत्य दरवेळे प्रमाणे स्वीकारले नाहीत, उलट तुम्ही त्यांना आजही घाबरता म्हणून तर तुम्ही त्यांना जातीत बांधून ठेवलेत. कला , संस्कृती आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून त्यांना फक्त त्यांच्या जातीपुरतेच मर्यादित ठेवलेत. तरीहि या महापुरुषांचे प्रगतीकडे घेऊन जाणारे , जाती जातीतील दरी संपविणारे , देशाला एकसंघ ठेवणारे पुरोगामी आणि विज्ञानवादी विचार संपले नाहीत. उलट आज नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि त्यांच्यासारखेच अनेक विचारवंत आणि प्रबोधनकार तयार झालेत. आज तुम्ही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या केलीत. यावर मला तुम्हाला हेच सांगायचे आहे कि, तुम्ही त्यांच्या शरीरावर गोळीबार केलात, पण त्यांच्या विचारांवर गोळीबार करणारी बंदूक अजून निर्माण झालेली नाही, आणि भविष्यात तयार होऊ शकत त्यामुळे तुम्ही हा विचार सोडून द्या कि व्यक्ती मारल्याने त्याचे कार्य आणि विचारही मरतील तर हा तुमचा विचार मूर्खपणाचा आहे . नरेंद्र दाभोलकर , गोविंद पानसरे यांच्यासाखेच चार्वाक आणि बुद्धांचा वारसा पुढे नेणा ऱ्या आधुनिक संतानी आमच्या सारखेच लाखो “ बुद्ध” येथे तयार केलेत, आमच्या सारखे लाखो दाभोळकर आणि पानसरे काना कोपऱ्यात उभे केलेत, त्यात कोणाकोणाला मारणार तुम्ही? हि क्रांतीची, प्रगतीची लढाई न कधी थांबली होती न कधीही थांबणार नाही. उलट आम्ही आता अगदी जोमाने विचारांच्या तलवारी पाजळल्यात, त्यांना प्रगतीची धार दिलीय, क्रांतीच्या कार्याला जोमाने सुरवात केलीय.
प्रमोद शिंदे
११ जून २०१५
No comments:
Post a Comment