Thursday, July 30, 2020

गावाकडच्या गोष्टी - भाग 2

गावाकडच्या गोष्टी- भाग 2

मागच्या भागात आपण पाहिलंत, शेठ नी गावात जाहीर केलं की ते गावासाठी पैसा देणार, त्यामुळे निर्मलाबाई काहीशा चिंतेत होत्या. 
आता पुढे...
निर्मलाबाई : आलात का? कुठे होतात 15 दिवस? 
शेठ : हे बघ निर्मले, मला सांग तू माझी  भक्त आहेस की नाय? 
निर्मला बाई : डोम्बल माझं! हे काय आता नवीन? 
शेठ : निर्मले, गावात मी असलो नसलो तरी माझ्या बद्दल माझे भक्त कधी काय विचारतात का? 
निर्मलाबाई :नाय 
शेठ : मी कुठे जातो, काय करतो? किती तरी दिवस दिसत नाय, तरी हे भक्त कधी विचारतात का? 
निर्मला बाई :नाय 
शेठ : का? सांग 
निर्मलाबाई : नाय ठाऊक !
शेठ : अगं, माझ्या भक्तांना माझ्या दोस्तानी असं सांगितलंय की मी 22 तास काम करतो.
निर्मला बाई :मग? 
शेठ : त्यामुळे माझे भक्त जसे मला विचारत नाही अन मी पंधरा दिवसांनी भी समोर येऊन जे काही सांगेन त्याला माना हलवतात ना,  तसंच तू भी करायचं !
निर्मलाबाई : अहो पण तुमच्या सांगण्याहून म्या गावातील लोकांना मदत मिळेल म्हणून सांगून आले,  एकदा नाय तर चार दिस रोज जात होते. पण मग आता कुठून आणू पैसा? 
शेठ : निर्मले,  निर्मले मदत नाय गं,  कर्ज....कर्ज.... 
निर्मलाबाई : हो तेच ते कर्ज.... पण कुठून देऊ? 
शेठ : तू तर नविन असल्यागत बोलू नकोस, अगं पॅकेज बोलायचं! किती छान शब्द आहे पॅ...के....ज 
मग आपल्या सगळ्या गाढवांना 
गावभर पॅकेज जाहीर..... पॅकेज जाहीर.. असं बोंबलायला सांगायचं !
निर्मलाबाई : गाढवांना? 
 शेठ : अगं गाढवांना म्हणजे गाढवावर बसून दवंडी देणाऱ्या दवंडी खोरानां  !
नाय तर काय कामाचे आहेत ते! मी जे सांगल ते बोंबलायचं !
एकदा सगळीकडे गावभर पसरलं  की लोकं शांत बसत्यात, मग माझे भक्त आहेतच की टाळया वाजवायला!
निर्मलाबाई :अहो पण कोणी कर्ज मागायला आलाच तर त्या कर्जाला पैसा आणू कुठून? 
शेठ : निर्मले, अगं आधीच लोकं कर्ज म्हटलं की घाबरतात त्यामुळे कुणी जास्त पुढं येत नाही आणि एखादं आलंच तर आपल्याला थोडीच द्यायचंय कर्ज ते त्या बँका बघून घेतील....
निर्मलाबाई : वा वा वा... हात जोडले तुमच्यासमोर
क्रमश..... 
- -प्रमोद शिंदे 
गावाकडच्या गोष्टी

(या वरील चर्चेचा कोणत्याही मृत किंवा जीवित व्यक्तीशी, स्थळाशी, काळाशी संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

No comments:

Post a Comment